नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात ,केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि मार्फत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मदत म्हणून अनुदान दिले जाते.केंद्र सरकारने १७ ऑक्टोंबर रोजी pm kisan सन्मान निधी चा १२ वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित केले आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना २००० रुपये हप्ता प्राप्त झाला नाही, कोणत्या कारणामुळे आपले Pm Kisan चे पैसे आले नाहीत.या हप्त्याचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नसून ते कोणत्या कारणामुळे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही,
Pm Kisan योजना हप्ता जमा न होण्याची कारणे :
- PM किसान रजिस्ट्रेशन करताना चुकीची माहिती भरल्याने.
- बँक पासबुक व आधार कार्ड यामध्ये खूप तफावत आढळून आल्याने.
- बँक खात्याला ई-KYC केलं नसेल बँक तुमचे खाते होल्डवर ठेवला असेल
- तुमचे बँक खाते आधार NCPI लिंक नसेल तर
- PM किसान योजनेचा E-KYC तुम्ही केला नसेल.
- PM किसान योजनेचा पैसे नेमकं कोणत्या खात्यात गेले:
शेतकऱ्याने PM किसान योजनेचा रजिस्ट्रेशन करताना जे बँक खाते दिलेले आहेत त्या बँक खात्यामध्ये १० व्या हप्ता पर्यंत याच खात्यामध्ये जमा होत होते.PM किसान चा वेबसाईट मध्ये काही बदल केल्यानंतर ११ व्या हप्ता पुढील आजचे सगळे शेतकऱ्यांचे जे बँक खातं आधार NCPI लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये.DBT च्या माध्यमातून PM किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत.PM किसान योजनेचे पैसे तुम्ही दिलेले बँक खाते मध्ये जमा झाले नसतील तर शेतकरी मित्रांनो तुमचे जेवढे बँक खाते आहेत ते सर्व बँक खाते एकदा चेक करा.
PM किसान पैसे आले नाहीत
येथे तक्रार करण्यासाठी