अतिवृष्टी नुकसान भरपाई | निकषात न बसणाऱ्या सर्व बाधित शेतकऱ्यांना Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2022

अतिवृष्टी नुकसान भरपाई :-
शेतकरी मित्रांनो,खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची नुकसान भरपाई वाटपासाठी ठरविण्यात आलेल्या निकषानुसार पात्र ठरलेल्या गावांना मंडळांना आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा एक महत्वपूर्ण निर्णय काल राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे २०२२ खरीप हंगामामध्ये राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे खूप मोठे नुकसान झालेला आहे. यामध्ये मुख्यता महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुस्कान झाले आहे. आजच्या लेखामध्ये अतिवृष्टीमुळे आतापर्यंत वितरित केलेले निधी कालच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने ठरवलेले नुसकान भरपाई ची निधी या बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा लेख पूर्णपणे वाचा.
अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या सर्व बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयाची मदत जाहीर :
अतिवृष्टीचे नुसकान भरपाई चे काही निकष महाराष्ट्र सरकारने यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचे पंचनामा करण्यासाठी ठरवले होते, जून महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टी जास्त प्रमाणात झाला आहे त्या ठिकाणी ६५ मिलि मीटर पावसाची नोंद झाले आहे आणि त्या ठिकाणी पिकाचे नुकसान झाले आहे अशा ठिकाणच्या शेती पंचनामे शासनाच्या मार्फत केली गेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नुकसानभरपाईचे वाटप ही झाले आहे.कालच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने इतर अतिवृष्टीच्या विहित करण्यात आलेल्या न बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा नव्याने निधी जाहीर केला आहे यामध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही परंतु सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आणि त्या ठिकाणी पडलेला पाऊस ६५ मिलि मीटर कमी नोंद झाले आहे असे एकूण महाराष्ट्रातील ६ लाख शेतकरी या नुसकान भरपाई पासून वंचित राहिले होते अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आता मदत जाहीर झाला आहे.
नुकसान भरपाईचे निधी वाटप :
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ६ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ७५५ कोटींची मदत दिली जाणार आहे सततच्या पावसाने बाधित झालेल्या पिकाचे नुकसान व ६५ मिलि मीटर ची निकषात न बसणारे या राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार यापूर्वी निकषात बसणाऱ्या ३० लाख शेतकऱ्यांना ३६०० कोटी रुपयाची निधी वाटप करण्यात आले आहे .
Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2022
राज्यातील काही जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले परंतु त्या ठिकाणी शासनाच्या निकषाप्रमाणे पावसाची नोंद ६५ मिलिमीटर त्या कमी झाले त्या ठिकाणी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने काही जिल्ह्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते, सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ४४६.३१ क्षेत्र बाधित झाले आहे, त्याचबरोबर जालना औरंगाबाद परभणी हिंगोली बीड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार४८९ हेक्टर जमीन तसेच यवतमाळ जिल्ह्यात ३६ हजार ७११ हेक्टर इतके क्षेत्र या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाकडून कालच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने या सर्व शेतकऱ्यांसाठी ७५५ कोटी रुपयाची मदत जाहीर झालं आहे .(ativrushti nuksan bharpai list 2022)नुकसान भरपाई यादी 2022,(osmanabad nuksan bharpai list 2021)
जिल्हा निहाय होणार लाभ (हेक्टर मध्ये ) :
- सोलापूर -७४४४६ हेक्टर क्षेत्र
- यवतमाळ -३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
- उस्मानाबाद -११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
- लातूर -२१३२५१ हेक्टर क्षेत्र
- औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
- जालना – ६७८ हेक्टर क्षेत्र
- परभणी -२५४५.२५ हेक्टर क्षेत्र
- हिंगोली – ९६६७७ हेक्टर क्षेत्र
- बीड -४८.८० हेक्टर क्षेत्र
वरील क्षेत्रासाठी एकूण निधी ७५५ कोटी रुपये इतके आहे .